अॅड. विजयराव हिरवे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शेवरी विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर यशस्वीपणे काम केले होते. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सहकार चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. एक अभ्यासू, कायदेतज्ज्ञ आणि अत्यंत मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची पंचक्रोशीत मोठी ओळख होती.
समाजातील प्रत्येक घटकाशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे आणि स्नेहाचे संबंध होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. शेवरी ग्रामस्थांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. “एका अनुभवी आणि अभ्यासू मार्गदर्शकाला आम्ही मुकलो आहोत,” अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने हिरवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
..
