अजित जगताप
सातारा दि: आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेऊन सध्या कृत्रिम पेट्रोल टंचाईचा जुनाच फंडा शोधण्यात आला. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांचे मार्केटिंग सोपं झाले. जागरूक ग्राहक हा पेट्रोल- डिझेल व सी.एन.जी. वर चालणाऱ्या वाहनावरच जास्त भिस्त ठेवत आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या ही दुर्घटना घडतात त्यामुळे लोकांनी मार्केटिंग फंड्याला फसू नये. कृत्रिम डिझेल पेट्रोल टंचाई असल्याचाही आरोप काही वाहन चालकांनी केला आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती ही सुरू आहे.
अमेरिका- इसराइल- इराण युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचंड नुकसान झाले असले तरी कोणतीही तेल विहिरी मिसाईल व बॉम्ब मुळे पेटलेली नाही. फक्त अफवा पसरवून अनेक जण त्याचा फायदा घेऊ लागलेले आहेत. सत्य समजण्यापूर्वीच काहींची फसगत होत असते. कोरोना काळातही अशा पद्धतीने फसगत करून अनेकांना आर्थिक गंडा घालण्यात आला होता.
वैद्यकीय क्षेत्र व औषध निर्माता कंपन्या यांच्या नफ्यामध्ये भरमसाठ वाढ झाली असली तरी मृत्यूचे दर कमी करता आलेले नाही. तसाच काहीसा प्रकार आता वाहनांच्या बाबतीत सुरू झालेला आहे. सध्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावरील खड्डे व निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे वाहनांची वाट लागत आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे इलेक्ट्रिक वाहनांचे होत असल्यामुळे गाड्या आपल्या डिझेल पेट्रोलचे वाहन बरे असे आता लोकांना वाटू लागलेले आहे. मोठ्या प्रमाणात उत्पादन केलेल्या इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहक नसल्यामुळे अगोदर पेट्रोल डिझेल पंपावर गर्दी दाखवा. त्यानंतरच इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या जाहिरातीत दाखवा किंवा छापा असा गुप्त पद्धतीने प्रचार सुरू झाल्यामुळे जाहिरातीचा मिसाईल सारखा मारा होत आहे.
नेमक्या आठ पंधरा दिवसात इलेक्ट्रॉनिक वाहनाच्या जाहिरातीचा मारा होऊ लागल्यामुळे या पाठीमागे मार्केटिंग असल्याचे अनेक अर्थ तज्ञांनी सांगितले. कोरोना काळामध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा व त्याबाबत लागणारी साधनसामग्री सध्या धुळखात पडू नये. कोट्यावधी रुपये खर्च करून सुद्धा आता अनेक यंत्रणा कोलमडून पडलेले आहे. काही साधनसामुग्रीने भंगार म्हणून दवाखाने मधून डिस्चार्ज घेतलेला आहे. तशीच परिस्थिती आता निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. सध्या कडक उन्हाळ्यामुळे अनेक वाहने पेट घेतात. तापमान वाढल्यामुळे उन्हाळ्यात वाहनाचे टायर सुद्धा फुटलेले घटना घडलेले आहेत. भविष्यात पावसाळ्यात इलेक्ट्रिक वाहनांना शॉर्टसर्किट होण्याची भीती काही वाहन चालकांनी व्यक्त केली आहे. खंबाटकी घाटामध्ये ट्राफिक जाम झाल्यानंतर अनेक इलेक्ट्रॉनिक वाहने टोइंग गाडीने घेऊन जावे लागले. यासाठी तीन हजारापासून पाच हजारापर्यंत अनेकांना खर्च आला होता. सेकंड हॅन्ड वाहन घेताना अनेक जण इलेक्ट्रॉनिक वाणी नको भावा असं म्हणत आहेत.
वास्तविक पाहता अत्याधुनिक यंत्रणा व कमी डिझेल पेट्रोलचा तसेच इथेनॉल वापर काळानुरूप होणे गरजेचे आहे. त्याबद्दल कोणाची दुमत नाही. परंतु सध्या कृत्रिमरीत्या पेट्रोल डिझेलच्या टंचाईने काहींची फसगत होत आहे. सातारा जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर वाहनांची तुरळक गर्दी असून मुबलक प्रमाणात पेट्रोल व डिझेल असल्याने नियमितपणाने इंधन भरणाऱ्यांना इंधनाची टंचाई जाणवत नाही. बऱ्याच पेट्रोल पंपावरची तुरळक गर्दी दिसून आलेली आहे. सध्या प्रसार माध्यमातून पेट्रोल पंपावर त वाहनांची गर्दी दाखवली जात आहे . तो व्हिडिओ क्लिप व बातम्यांमधून दिसणारे फोटो हे आपल्याला बुद्धीभेद करू शकतात. त्यामुळे केंद्र व राज्य शासन असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असून अथवा पुरवठा विभागाने सातत्याने याबाबत जनजागृती केलेली आहे. शेवटी लोकांनी काळजीत न पडता धीर धरला पाहिजे. वस्तूची समजून घ्यावी. व्यापारी वृत्ती वाढल्यामुळेच अशा घटना घडत आहेत. अशी माहिती देण्यात आली. सातारा शहरातील रेणुका पेट्रोल पंप चे मालक रितेश रावखंडे यांनी सांगितले की, मुबलक प्रमाणात पेट्रोल व डिझेलची विक्री नियमित होत आहे. नेहमीचे ग्राहक पेट्रोल डिझेल खरेदी करतात. कोणताही तुटवटा नाही. ज्यांना पेट्रोल व डिझेल हवे आहे त्यांनी कोणत्याही पेट्रोल पंपात जाऊन डिझेल पेट्रोल अथवा सी.एन.जी. भरावे असे त्यांनी स्पष्ट केले. काही वेळेला विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर काही मिनिटासाठी समस्या होते. तर काहीजण गर्दी दाखवत असले तरी पेट्रोल व डिझेलचा साठा मुबलक आहे. हे सुद्धा जाणीवपूर्वक लोकांपर्यंत पोहोचवावे. अशी विनंती केली आहे.
.——– ——– ——- ——- ——- ——

फोटो सातारा जिल्ह्यात मुबलक पेट्रोल असल्यामुळे काही पेट्रोल पंपावर वाहन चालकांची अशी तुरळक गर्दी होती. (छाया– अजित जगताप, सातारा)
