मायणी प्रतिनिधी—

—–

गरळेवाडी तालुका खटाव या गावासाठी टेंभू उपसा सिंचन योजनेच्या सुधारित आराखड्यास महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून तांत्रिक मान्यता मिळाली आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्यामुळे या योजनेला सुधारित वाढीव मान्यता मिळाल्याचे परिसरातील सिंचन व पिण्याचा प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जालनात 10 जुलै 2026 रोजी झालेल्या बैठकीत गारळेवाडी ग्रामस्थांच्या मागणीनुसार सुधारित तांत्रिक आराखड्याची घोषणा करण्यात आली त्यानुसार पाईपलाईनच्या व्यासात वाढ करून आवश्यकते तांत्रिक बदल करण्यात आले या बदलामुळे गव्हाण तलाव, वाऱ्याचा तलाव, दर्याचा तलाव, मदने तलाव, झिरपी तलाव, तसेच कलेढोण हद्दीतील एक तलाव अशी एकूण सहा तलाव त्यामुळे 23.5 एम सी एफ टी पाणी साठवण्याची क्षमता निर्माण होणार आहे यामुळे गारळेवाडी व परिसरातील शेती ओलीताखाली येणार आहे दरम्यान टेंभुळुकसान सिंचन योजनेच्या सुधारित आराखड्यास मंजुरी दिल्याबद्दल ग्रामस्थांनी नामदार जयकुमार गोरे यांच्या अभिनंदन केले या कामासाठी घारेवाडी चे सुपुत्र व सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी आर गारळे यांनी विशेष प्रयत्न केले त्यांना मारुती गारळे व सरपंच अनिल गारळे यांनी विशेष सहकार्य केले तसेच पोलीस पाटील धनाजी गारळे यांनी विशेष परिश्रम घेतले जयकुमार गोरे यांचा फोटो टाकावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *